सात बारा म्हणजे काय व त्यात कशाचा समावेश होतो?

Reshma
By Reshma
4 Min Read
सात बारा म्हणजे काय व त्यात कशाचा समावेश होतो?

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

सात बारा म्हणजे काय व त्यात कशाचा समावेश होतो?

जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे   सातबारा होय.

जमिनीची माहिती ज्यामध्ये असते त्याला गाव नमुना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी 1-21 अशी विभागणी केलेली असते. त्यातील 7 नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर 12 नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण 7/12 मध्ये केलेले असते.

7/12 संबंधीची महत्वाच्या महत्वाच्या बाबी:

1)   7/12 हा जमीन मालकी हक्का चा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो.

2 7/12 बेकायदेशीर ठरविला जात नाही तो पर्यंत तो कायदेशीर मानला जातो.

3 7/12 ची नविन पुस्तके साधारणता 10 वर्षानी लिहिली जातात.

4 7/12 तील मालकी व इतर हक्का च्या ठिका नी कोण तेही महत्वाचे लिखान हे फेरफार नोंद  के ल्या शिवाय ये वू शतेकत नाही. गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही.

5 प्रतेक वेळी 7/12 काढल्यावर कर्ज व कर्ज देना री संस्थेची नावे, विहीर बोअरवेल, फळझाडे, झाडे अशा नोंदी खात्रीने पाहिल्या पाहिजे.

6 प्रतेक स्वतंत्र गटा साठी एक सातबारा असतो.

7 7/12 पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते .

8     7/12 त मालकाशिवाय दूसरया व्यक्तिचे नाव , कुळ , खंड सदरात थेट लावण्याचे अधिकार  तलाठी यां ना नाही.

9 7/12 वरुण जमिनी च्या मालकी हक्का बाबत माहिती मिलते.

10 पूर्वी जेव्हा 7/12 नसत तेव्हा शेतवार पत्रक व सूडपत्रका वर नोंद लिहत.

फेरफार / गावनमुना 6 मधील नोंद

गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही यावर घेतले ल्या नों दी च 7/12 वर येतात. त्यामुळे शेतकर्याच्या दृष्टिने फेरफार उता रयाला अनन्य साधारण महत्व आहे. यातिल तपशील हा चार भागात लिहिला जातो.

यात १ ) फेरफार नोंदणीचा अनुक्रमांक

2) हक्क प्राप्त व्यक्तिच्या अधिकाराचे स्वरुप, व्यवहाराचे स्वरुप दिनांक, संबंधित खातेदारांची नावे, मोबदला रकम आदी. बाबीचा उल्लेख असतो. 3) जमीन ज्य़ा गटात अथवा सर्वे नम्बर मधील आहे त्याचा नम्बर लिहिला जातो.

4) शेवटी फेरफार बरोबर आहे असे प्रामाणित करनारा अधिकारी / मंडल अधिकारी यांचे पदनाम व स्वाक्षरी असते.

फेरफार नोंद व प्रामाणित नोंद

शेत जमीन अथवा जमीन व्यक्तीकडे जमीन खरेदी करून किंवा इतर कारणाने येते.अशी प्राप्त झालेली जमीन आपल्या मालकीची आहे यासाठी त्याचे रीतसर नोंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती जमीन आपल्या कडे कश्या पद्धतीने आली आहे हे दर्शवणारे पुरावे सादर करावे लागतात त्या कागदपत्रांच्या आधाराने सर्वप्रथम फेरफार नोंद लिहिली जाते.व ती प्रमाणित आहे किंवा नाही हे तपासण्याची प्रक्रिया सुरु होते.

१.कोणत्याही कागदपत्राद्वारे जमिनीचा हक्क प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी सर्व संबंधिताना नोटीस देणे आवश्यक असते. नोटीस दिल्याशिवाय फेरफार मधील नोंद प्रमाणित करण्याची प्रक्रीयापूर्ण होत नाही.

२.खरेदी करणार व घेणार हे वेगवेगळ्या गावाचे असतील तर त्याचे नाव पत्ते तलाठी यांना कळविणे गरजेचे असते.त्याच प्रमाणे वारसाच्या नोंदीसाठी सर्व वारसांचे नाव पत्ते व वारसांचे मयत खातेदारांशी नाते कळविले पाहिजे.

३.फेरफार नोंद लिहिल्यानंतर ती प्रमाणित होणे करिता नोटीस काढल्यानंतर किमान १५ दिवसाचा कालावधी जाऊ देणे गरजेचा असतो.या नंतर नोंद प्रमाणित करता येते .व त्यानंतर दुरुस्तीचा ७/१२ मिळतो.

फेरफार नोंद व प्रमाणित नोंद यामधील काही महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.

१.फेरफार नोंद झाल्यावर लगेचच त्याची नोंद ७/१२ वर येते.

२.काही कारणाने जर सूची २ मध्ये चूक झाली असल्यास ते खरेदीखत सादर करून सब रजिस्टर यांच्या कार्यालयातून दुरुस्ती करता येते.

३.सातबारा वरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो.

४.कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत ती खरी मानण्यात येते.

५. जमिनीच्या अधिकारात जसजसा बदल होतो. म्हणजेच जमिनीचे मालक जसे बदलतात त्या क्रमवारीने त्याच्या नोंदी फेरफार मध्ये नमूद केलेल्या असतात.

६. फेरफार वरून खातेदाराच्या मालकीच्या एकूण जमिनीबाबत माहिती मिळते.

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
22 Reviews
  • मयुर says:

    माझ्या 7-12 ऑनलाईन उताऱ्यावर ‘हा ७-१२ बंद झाला आहे’ असा शेरा 1 जाने 18 पासून दिसत आहे,हा काय प्रकार आहे व बंद करण्या संदर्भात कोणतीही पूर्व सूचना न देता हे असे कसे काय होऊ शकते सर?

    Reply
  • kajal sonawane says:

    AAmhala shetisathi fasvl gely..amhala madat havi changlya aani pramanik advocatechi..aamchi case chalu ahe geli 8 varsh zalit.

    Reply
  • Sandeep Sharad says:

    I want to take 4 guntha from 11 guntha.How can I make kharedi khat and how I recorded on 7/12

    Reply
  • अयाज सतार खोत says:

    मैं एक जमीन खरीदा हूं घर के साथ 15 साल पहले पर उसके खरीदी पेपर है मेरे पास पर उसकी नॉन नहीं है सातबारा में पंचायत के साथ 12 में मेरी मां का और मेरे पिताजी का नाम है पर तलाठी के पास जो सातबारा है उसमें पुराने मालिक का नाम है तो इसके लिए मुझे क्या करना पड़ेगा सर पर मेरे पास खरीदी पेपर है तो आप मुझे सजेस्ट करें मुझे क्या करना पड़ेगा रजिस्ट्रेशन के लिए शुक्रिया मेरी ईमेल ID नीचे है

    Reply
  • संदिप चित्ते says:

    नमस्कार सर,
    आपणांस विनंती व सांगावे की प्लाँट खरेदी झाल्यापासुन किती दिवसात ७/१२ उतारा मिळतो?

    Reply
  • Gaurav belekar says:

    mazya ajobani hoti tvdhi property total 100acre inam mhnnun dili tyach bakahishpatra zal tr ti Prt milvta yeu shkte ka

    Reply
  • तुषार शेवाळे says:

    माझ्या 7-12 ऑनलाईन उताऱ्यावर ‘हा ७-१२ बंद झाला आहे’ असा शेरा 1 जाने 18 पासून दिसत आहे,हा काय प्रकार आहे व बंद करण्या संदर्भात कोणतीही पूर्व सूचना न देता हे असे कसे काय होऊ शकते सर?

    Reply
  • सुनील घुले says:

    सात बारा दुरूस्ती साठी अर्ज करून सहा महीने होऊन गेले परंतु काहीच झाले नाही.तहसील कार्यालयात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात.पुढे काय करावे लागेल ते सांग

    Reply
  • Prasad says:

    Amchya ajobanchya nava var Ekatra Kutumb Pudhari as lagla ahe….mg te kadhnyasathi kay karave?? Karan ajobanchya bhavanchya vatanya zalya ahet…ani amchya baba nche naav pn jaminivar lagle ahe..

    Reply
  • जालंदर वीर says:

    15 वर्षा पूर्वी ची नोंद असेल तर ती आता आमला त कशी आणायची

    Reply
  • नितीन पाटील says:

    सावरगाव तालुका येवला नाशिक येते माझ्या वडिलानचि वडिलोपार्जित जमीन अहे पन माझ्या वडिलांचे वडिलांनी ती कुणाला तरी विकली असे म्हणतात.सध्या वडिलांचे चुलत भाऊ हि जमीन सांभाळत आहेत.ते आम्हाला साधे रेशनकार्ड किंवा जातीचा दाखला हि देत नाहीत. ७/१२ वर कुणाचे नाव आहे ,व ती जमीन मिलवन्यासाठि काय करावे लागेल।

    संपर्क करा

    Reply
  • sandip r patil says:

    Hi jamini var ji varas lagte tyavarun bhandan hotat pan ekda mulich lagn zhall ki tich naav tyacha 7/12 var add kara mhanje bhandan honar nahi ani naath tikun rahtil.maherchya jamini var ticha hakk rahnar nahi ticha hakk sasrchya jaminivar rahil

    Reply
  • श्रीमंत says:

    माझ्या शेताला जाण्यासाठी रस्ता नाही दुसर्याच्या रानातून जात होतो पण त्याने किरकोळ वादवरून 2वर्षे झाली रस्ताबंद केला आहे त्याचे राण मेन रोड टच आहे आणि माझे 100 ते 125 फुट आत आहे त्यासाठी काय करावे लागेल पूर्वी तेथे सर्वे नंबर होता पण सध्या तुकड बिला नंतर त्याच्या रानातील सर्वे नंबर कट झाला आहे आणि शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्तानाही तरकाय केले पाहिजे ?सध्या कोर्टात केस चालू आहे तर काय तेथून रस्ता मिळू शकतो का कोर्टामार्फत ?तहसिलदार ने तेथून रस्ता 8 फुट मंजूर केलता पण कोर्टाकडून तो फेटाळला आहे तर रस्ता मिळेल का?

    Reply
  • संतोष लोकरे says:

    मी ज्यांच्याकडून प्लांट घेतलेला आहे त्याची फेरफार झालेली आहे परंतु जो मूळ मालक आहे याची फेरफार नक्कल पाहिजे आहे परंतु त्यामुळं मालकाची फेरफार झालेली नाही.फेरफार नं नाही आहे.मी आता काय करावे

    Reply
  • vitthal yewale says:

    सातबाराच्या विषयी माहिती द्यावी तसेच नाव दूरूस्ती संबंधित माहिती द्यावी

    Reply
  • vitthal yewale says:

    7/12विषयीची माहिती द्यावी तसेच नाव दूरूस्ती संबंधित माहिती द्यावी

    Reply
  • kakdevasant says:

    माझा एका संकुल मधील पहिल्या मजल्यावर गाळा नं. ४ व ५ असे अगदी सलग दोन गाळे आहेत
    ते मी दिनांक २००१ व २००५ साली रोजी ह्फ्त्याने घेतले आहे.
    माझे जिवलग मित्राला मोटर ड्रlव्हिंग स्कूल हा व्यवसाय करावयाचा असल्याने मोटर वाहन स्कूल निमान्वये त्याच्या गरजे नुसार म्हणजे गाळा नं. ४ (१४.८१ चौ.मी.) व गाळा ५ (१४.५२ चौ.मी.) पैकी काही भाग म्हणजे १.६२ चौ.मी. असे एकत्रित करून (१६.१४ चौ.मी.) भिंत न सरकविता खरेदीविक्री नियम डावलून लिहून दिला लिहून व प्रेमापोटी त्यांची गरज पूर्ण केली.
    त्यांनी ते स्कूल ४ ते ५ वर्ष व्यवस्थित चालविले व मला माझा गाळा ठरल्याप्रमाणे परत केला आमच्यात ठरल्याप्रमाणे त्यांनी देखील कृती केली जसे त्या खरेदी खताचा उपयोग मोटर ड्रlव्हिंग स्कूल चा परवाना मिळविण्या व्यतरिक्त कुठेही केला नाही. म्हणूनच आजरोजी देखील दोन्ही गाळयांचा ताबा व नियमानुसार मालमत्तेच्या कार्डातील उताऱ्यात नाव माझे आहे. आज अकरा वर्षानंतर त्या खरेदीखताचा उपयोग करून ते माझ्या कडून गाळा मागत आहेत. माझे एकत्रित कुटुंब असल्यानेमाझा खूप मनस्ताप झाला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
    १) जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्येक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे
    २) करारनामा अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेचा खरेदी खत रद्द कसे होते ?

    Reply
  • bhushan tamore says:

    भुषण.. तक्रार बोईसर.तालुका पालघर. जिल्हा पालघर . B.a.r.c कंपनी आॅफिस करिता आमचा वडिलांच्या वडिलाची जागा दिली होती ( तारापुर ,घिवली) त्या जमिनि बद्दल दुसरी जमिन कुठे देली व निवाडा रक़म कोणास दिली (सन 1961)माहीती कशी काठावी..

    Reply
  • dhananjay says:

    तक्रार अर्ज राजापुर : धाऊलवल्लि (तेलिवाडी) ग्रामपंचायत हद्दीतील 
    धोंडू भिकाजी राणे यांच्या घराचा फेरफार करण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेला हा असेसमेंटचा फेरफार अवैध असून तो रद्द करावा, अशी तक्रार मी धनंजय मनोहर राणे( धोंडू भिकाजी राणे यांचा नातू ) करीत आहे. याबाबत मी माननीय गटविकास अधिकारी यांना कळकळीचे  निवेदन सादर करीत आहे की प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाही लवकरात लवकर करावी. वारसा हक्काच्या कायद्यांने १७ जून १९५६ रोजी हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ च्या कायद्याने मी न्याय मागत आहे.

    माझे आजोबा कै धोंडू भिकाजी राणे ह्यांच्या नावे मौजे धाऊलवल्लि येथे 1948 ते 1967 नमूना 8 नियम 32-1अससेमेंट लिस्ट उतारा जोडल्याप्रमाने आमच्या आजोबांचे घर होते भोगवट नाव खुद्द जुना घर न २४३ नविन घर न ३६९ आहे . माझ्या आजोबांच्या मृत्युपश्चात हे घर त्याच्या वारसांच्या नावे झाले पाहिजे होते परंतुु ग्रामपंचायातिने रामचंद्र भिकाजी राणे (धोंडू भिकाजी राणे याचे छोटे भाऊ ) याच्या नावावर कोणताही फेरफार न करता असेसमेंट वरील नाव बदल अवैध पध्दतिने केले व आमच्या कुटुंबावर अन्याय केला. आमचा आमच्या घरावर हक्क असतानाही आम्हाला त्यातून बेदखल केले. घराच्या मालमत्ते विषयी विचारले असता दत्ताराम रामचंद्र राणे व् उदय दत्ताराम राणे यानि 1984 ला मनोहर धोंडू राणे यांच्यावर जिवघेना हल्ला केला व जीवे मारण्याची धमकी दिली. दत्ताराम रामचन्द्र राणे हे मंत्रालय शिक्षण खात्यात नोकरीला होते स्वताच्या फायद्यासाठी धोंडू भिकाजी राणे व् त्याच्या वारसांची फसवनुक केली. आता मी कायदयाचा आधार घेतला व् माहितीचा अधिकार वापरला.
    ग्रामपंचायत व् माननीय सरपंच याच्या नोटिसा प्रमाने 11-03-2016 रोजी सकाळी 10 वाजता व् 19-03-2016 रोजी दुपारी 12 वाजता मी हजर होतो.ग्रामपंचायत नोटिसा प्रमाने जा क्र ग्रा पं धा/196/2016 पत्रा प्रमाने 1967 ते 1980 च्या कालात घर क्र 369 च्या फेरफारा सबंधी दत्ताराम रामचंद्र राणे याचे पुत्र उदय दत्ताराम राणे कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत.
    आमच्या आजोबांनी  (धोंडू भिकाजी राणे ) यांनि 1967-1970 या काळात घर बांधले होते व् ते कामाकरिता मुंबई येथे कुटूंबासहित वास्तव्य करीत होते.त्यांच्या नकळत त्याचे नाव रद्द करून त्या ठिकाणी त्यांचे छोटे भाऊ रामचंद्र भिकाजी राणे याचे नाव कोणताही फेरफार न करता चुकीच्या पद्धतीने चढ़विन्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय धाऊलवल्ली पत्र जा क्र। ग्रा प धा -135/2015 दिनाक –  09/12/2015 सदर फेरफारसबंधी ठराव अगद कागदपत्रे नाहीत.धोंडू भिकाजी राणे यांचा मुत्यु 26/10/1976 ला झाला.पण मुत्युचे कारण अजूनही समजू शकले नाही त्यांना सांताक्रूझ मुंबई येथे विहिरीत ढकलून मारण्यात आले त्यानंतर 7/12 वर 1980 ला परस्पर वारसांची नावे घालुन रामचंद्र भिकाजी राणे यानि स्वताला एकत्र कुटुंब पुरुष जोडले.वारसाना नोटीसा न पाटविता तलाठी कार्यालयाने देखिल धोंडू भिकाजी राणे यांचे मुत्यु प्रमाणपत्र न मागता रामचंद्र भिकाजी राणे यांना एकत्र कुटुंब पुरुष बनविले.
    सहा क प्रमाने – जोडलेला आहे.
    1 । मनोहर धोंडू राणे 
    2 । गंगू धोंडू राणे 
    3 । चंद्रकांत धोंडू राणे
    4 । रामचन्द्र भिकाजी राणे ( एकत्र कुटुंब पुरुष )

    पण धोंडू भिकाजी राणे यांची पत्नी जानकीबाई धोंडू राणे याची नोंद केली नाही ? वारस तपास बरोबर केला नाही.

    मौजे धाऊलवल्लि येथील घराचे वर्णन
    घर नंबर 243 जुना /369 नविन
    खुद्द कै.धोंडू भिकाजी राणे ।
    घर-तेलीवाडी
    अससमेंट उतारा 1951 -1952
    कै धोंडू भिकाजी राणे ह्यांचे निधन 26/10/1976 साली झाले. त्यांच्या मृत्युचा दाखला अनुक्रमांक 88435- 3534 तारीख :- 30/10/1976 हा सोबत जोडलेला आहे.  असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.
    क्र.नांव
    मयताशी नाते
    १.कै.मनोहर धोंडू राणे
    मुलगा
    २.कै.सुमति रामचंद्र बाकाळकर
    मुलगी
    ३.श्री.चंद्रकांत धोंडू राणे
    मुलगा
    या घराचा ग्रामपंचायतीने 1967 ते 1980 मध्ये कोणत्याही प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध न करता बेकायदा फेरफार केला.  ग्रा.पं. प्रशासनाने घेतलेला अवैध फेरफार रद्द करावा, अशी तक्रार मी धनंजय मनोहर राणे या निवेदनातून करीत आहे. माननीय गटविकास अधिकारी यांनी आमचे कागदपत्र व्यवस्थित पड़ताळून पहावे आणि आम्हाला योग्य तो न्याय दयावा. ग्रा.पं. सरपंच यांनाही हे प्रकरण माहित आहे. कायद्याच्या तरतूदी प्रमाणे आपण आमचे सर्व पुरावे आणि कागदपत्र तपासून हे घर आमच्या धोंडू भिकाजी राणे यांच्या वारसांच्या नावे करण्यात यावे अशी विनंती

                                               
                   (धनंजय मनोहर राणे)
    प्रति,
    उपमुख्य कार्यकारी अधिकारी
    ग्रामपंचायत.
    जिल्हा परिषद रत्नागिरी.

    Reply
    • dhananjay manohar rane says:

      aplesarkar portal dyare maza nirnay lagla thanks

      Reply
  • अनिल says:

    गावि माझ्या वडिलानचि वडिलोपार्जित जमीन अहे पन माझा चुलता ति वहिलाटन्यास मनाई करतो शिव्या देते मारहानिचि भशा वापरतो । ७/१२ वर माझ्या वडलान्च्या नावा पुढे १.५८ हे.अार इसे लिहले अाहे । तर ती जमीन मिलवन्यासाठि काय करावे लागेल।

    Reply
    • धनंजय राणे says:

      मिळेल

      Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *